कॉलेज ची ट्रिप गोव्याला जात असताना,आम्ही मुंबई ते गोवा रेल्वे नी प्रवास केला...ट्रेन रात्रीची होती..ट्रेन मध्ये बसल्यापासन आम्ही होरर गोष्टींना सुरुवात केली..उगाच मज्जा म्हणून..काहीतरी थ्रीलींग....थोड्यावेळात, रात्री १-२ चा सुमारास गाडी कुठल्यातरी एका स्टेशन वर १५ मिन.साठी थांबली..प्लॅटफॉर्म वर भयाण शांतता होती..चहा वाला सोडून कुणीही प्लॅटफॉर्म वर नव्हते..जवळजवळ निर्मनुष्य स्टेशन होते.पाय मोकळे करायला आम्ही खाली उतरलो..मजा मस्ती सुरू होती..काहींनी चहा घेतला...गाडी सुरू व्हायच्या ५ मिन आधी फोटो काढायचेच राहिले ,हे लक्षात आले,,त्यामुळे आम्ही ग्रुप करून घाईघाईत फोटो काढला..रेल्वे चां १ ला भोंगा झाला..एका मैत्रिणींनी ट्रेनच्या दारात नच आमचा फोटो घेतला...आम्ही गाडीत बसलो...फोटो पाहायला घेतले...पाहतो तर काय... आमच्या शेवटच्या काही फोटोत एक धुरकट आकृती आमच्या मागे उभी होती..जवळ जवळ ६ फुटाची..जणू कुणी माणूस पोज देऊन फोटो काढायला उभा होता...प्रत्येक फोटोत बदल पण आकृती मनुष्याची होती..जणू कुणी समवयीन आमच्यात सामील व्हायला बघत होता...त्यानंतर आमची बोलतीच बंद झाली... शब्द फुटेना...घाबरलेल्या नाजरांनी आम्ही एकमेकांकडे बघितल...त्यांनतर आम्ही आमच्या रिझर्व्हेशन च्या सिट सोडून समोरासमोर असलेल्या दोन सिट स् वर दाटीवाटीने बसलो...रात्रभर एकच विचार कोण ,का, कसं?????? त्यारात्री आम्ही कुणीही झोपलो नाही...भिलेल्या मनाला एकच आधार श्रीराम जय राम जय जय राम....
No comments:
Post a Comment